Health Special News: भारतात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर ही तृणधान्ये मुख्यत्वे उपलब्ध आहेत. कुपोषण व आजारावर मात करायची असल्यास तृणधान्यांचा आहारातील वापर वाढविणे आणि ती योग्य प्रकारे नियमित आहारात समाविष्ट करणे हेही म्हणून तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा आपल्यासारख्या सीझनल हेल्दी खाऊ इच्छिणाऱ्यांचा गोंधळ असा होतो की, अमुक एखाद्या दिवसापासून आपण हेल्दीच खायचं असं ठरवतो. मग मस्त बाजरात जाऊन भरपूर हेल्दी धान्य, भाज्या घेऊनयेतो . एकाचवेळी बहु फायदे मिळावेत म्हणून सगळं मिक्स करून खाऊ लागतो. तुम्हीही अशा प्रयत्नातून कधी ना कधी ज्वारी- बाजरी- नाचणी- तांदूळ अशी पिठं एकत्र करून जाडजूड भाकरी खाल्ली असेलच, किंवा निदान कोणाकडून असे सल्ले तर ऐकले असतीलच. हो ना? पण हा सल्ला कसा आपल्याच आरोग्याला घातक ठरू शकतो हे आज आपण पाहूया…

नाचणी- बाजरी एकत्र का खाऊ नये?

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, ज्वारी किंवा बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा पातळसर पोळी ही निश्चितच पोषक असते. पण जेव्हा आपण एका वेळी अनेक तृणधान्ये एकत्र करतो त्या वेळी त्यातील जीवनसत्त्वांचा आणि त्यांच्या एकत्रीकरणामुळे त्यातील लोह, कॅल्शिअम, झिंक यांच्या पोषणमूल्यांवर परिणाम होऊ शकतो. एका वेळी एक किंवा दोन पूरक तृणधान्ये एकत्र करावीत म्हणजे त्यातील जीवनसत्त्वे पूर्णपणे मिळू शकतील. किंबहुना गव्हाच्या पिठासह तृणधान्ये जरूर एकत्र करावीत, पण हेल्दी म्हणून नाचणी आणि बाजरी किंवा ज्वारी यांचे मिश्रण सर्रास करू नये.

Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

हे ही वाचा<< स्विमिंगआधी किती तास काही खाऊ नये? पूलमध्ये जाण्यापूर्वी काय खायला-प्यायला हवे? तुमचे प्रश्न ‘इथे’ सोडवून घ्या

तृणधान्ये खाण्याची फायदेशीर पद्धत कोणती?

तृणधान्ये कितीही वाफवली किंवा त्यांच्यावर प्रक्रिया केली तरी त्यांतील जैवघटक आणि खनिजांचे प्रमाण हे केवळ ३ ते ५ टक्क्यांनीच कमी होते. शिवाय, तृणधान्ये आंबवून खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते आणि ती पचायलादेखील हलकी होतात. तृणधान्यांतील प्रथिनांचे योग्य प्रमाण मिळावे म्हणून त्यांना शक्यतो भाजून किंवा शिजवून खाणेदेखील उत्तम!