लंडन : दिवसाच्या २४ तासांपैकी १० तासांमध्येच अन्नपदार्थ खावे आणि उरलेल्या १४ तासांमध्ये उपवास करावा. असा उपवास केल्याने मूड, झोप, भूक यांमध्ये सुधारणा होते, असे ब्रिटिश वैद्यकीय तज्ज्ञांनी नव्या संशोधनानुसार दाखवून दिले आहे. तुमचे दररोजचे खाण्याचे वेळापत्रक दहा तासांपर्यंतच मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्याचे आरोग्यासंबंधी सकारात्मक फायदे होतात, असे या संशोधकांनी सांगितले. किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी युरोपीयन आहार पोषण परिषदेत हा संशोधन अहवाल सादर केला.

हेही वाचा >>> तुम्ही रोज तूप खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या….

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम

असंतत उपवास किंवा तुमच्या जेवणाचा वापर एका विशिष्ट वेळेपर्यंत मर्यादित ठेवणे ही वजन कमी करण्याची लोकप्रिय पद्धत आहे. या पद्धतीनुसार तुमचे दैनंदिन खाण्याचे वेळापत्रक १० तासांपर्यंत मर्यादित ठेवता येते आणि उर्वरित १४ तास उपवास करावा लागतो. उदाहरणार्थ जर तुम्ही सकाळी ९ वाजता पहिला घास घेतला असेल, तर संध्याकाळी सात वाजता त्या दिवसांतील अखेरचा घास तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर १४ तास काहीही खाणे टाळावे लागेल. या पद्धतीमुळे वजन कमी होते. मात्र ब्रिटिश संशोधकांच्या अहवालानुसार या पद्धतीमुळे मूड, झोप, भूक यांमध्येही लक्षणीय सुधारणा होते.

Story img Loader