अन्न, वस्त्र व निवारा यांप्रमाणे आता स्मार्टफोनसुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे. घरात सर्वांच्याच हातात स्मार्टफोन असल्याने लहानपणापासून बाळालासुद्धा स्मार्टफोनची आवड वाटून, मग ओढ लागते. पालकसुद्धा बाळाचे कौतुक म्हणून, तर कधी कधी नाईलाजाने त्याच्या हातात मोबाईल देतात. पण हळूहळू बाळ जसे मोठं होत जाते तसतसे त्याचे स्मार्टफोन अॅडिक्शन वाढत जाते. सध्या हीच गोष्ट अनेक पालकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे. मात्र, दुर्दैवी वस्तुस्थिती अशी आहे की, आपण सर्व जण आपल्या स्मार्टफोनमध्ये अडकलो आहोत. मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नसून, वेळ तपासणे, ठिकाण शोधणे, अलार्म सेट करणे, तिकिटे बुक करणे यांसाठी अशा अनेक गोष्टींसाठी मदत करतो. परंतु, या वाढलेल्या स्क्रीन-टाइमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मग यातून बाहेर पडणे कठीण वाटू शकते. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, जेव्हा मूल हट्ट करते किंवा रडते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी पालक सर्रास फोन त्याच्या हातात देतात. मूल कधी कधी फोनवर व्हिडीओ स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना दिसतात. आधी पालकांकडे त्यांचा फोन देण्यासाठी हट्ट करणारी मुलं हळूहळू मग स्वत:चा वेगळा स्मार्टफोन मागविण्याचा हट्ट करू लागतात. अनेक वेळा मुलं त्यांच्या हट्टाखातर खाणं-पिणंही सोडून देतात. मात्र, आता एका ट्रिकमुळे मुलांचे फोनचे व्यसन अवघ्या सहा मिनिटांत सुटू शकते.

डॉक्टरांनी सांगितली ट्रिक

Mobile phone tariff declined 94 pc since 2014 says Jyotiraditya
मोबाईल फोन सेवांचे दर देशात सर्वाधिक कमी; इतकी स्वस्त झाली सेवा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Treatment options for Smartphone vision syndrome
Smartphone vision syndrome: तुम्हीही मोबाईलवर सतत स्क्रोल करत असता का? मग होऊ शकतो स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम; वाचा लक्षणे आणि उपाय
Baba abuses young girl on the name of treatment touches badly in front of her parents shocking video viral
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Wisdom tooth extraction recovery tips after operation expert advice
जर तुम्हालाही अक्कलदाढ असेल, तर हे वाचाच…, तज्ज्ञांनी सांगितले अक्कलदाढ काढल्यानंतर २४ ते २८ तास काय करावे…
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
साताऱ्यात ‘जीबीएस’चे चार संशयित आढळले
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

“एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, केवळ सहा मिनिटे वाचन केल्याने तणाव ६८ टक्क्यांनी कमी होतो. वाचन वाढवल्याने तणाव कमी होतो आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. परिणामत: अशा प्रकारे मोबाईलचे व्यसनही सुटू शकते.

ससेक्स विद्यापीठातील संज्ञानात्मक न्यूरो सायकॉलॉजिस्ट डेव्हिड लुईस यांनी केलेल्या २००९ च्या अभ्यासातून असेही निदर्शनास आणले आहे, “पुस्तक वाचन हे केवळ तुमची एकाग्रताच वाढवत नाही, तर तुमच्या सर्जनशीलतेलाही चालना देते.

बंगलोर येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे बालरोग न्यूरोलॉजी, सल्लागार डॉ. रवी कुमार सी. पी. यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी जास्त प्रमाणात फोन वापरण्याचे नकारात्मक परिणाम कसे कमी करायचे ते सांगितले आहे. “वाचन केवळ मनालाच चालना देत नाही, तर सकारात्मक विचार आणि आकलन कौशल्येदेखील वाढवते. त्यामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि ज्ञानधारणेतही सुधारणा होते; जे शिक्षणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे दैनंदिन दिनचर्येमध्ये वाचन समाविष्ट करणे हा एक फायदेशीर पर्याय आहे, जो मानसिक आरोग्य सुधारण्यास प्रोत्साहन देतो.

हेही वाचा >> जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात

दिवसातून किती वेळ वाचन करावे?

एखाद्याने दररोज वाचनासाठी किती वेळ घालवला पाहिजे हे विचारले असता, डॉ. कुमार म्हणाले की, प्रत्येक दिवशी वाचनासाठी किती वेळ समर्पित केला पाहिजे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, फायदे मिळविण्यासाठी आपण दररोज किमान ३० मिनिटे ते एक तास वाचन करण्याचे लक्ष्य ठेवावे, अशी शिफारस केली जाते.

स्क्रीन टाइममध्ये वाचनाला प्राधान्य द्यावे. त्यांचा विश्वास आहे की, लोक तंत्रज्ञानाशी निरोगी नातेसंबंध जोपासू शकतात आणि एकाच वेळी त्यांची एकाग्रता आणि एकूणच संज्ञानात्मक क्षमता वाढवू शकतात, छंद जोपासू शकतात.

Story img Loader