Hair loss: केस गळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सामान्य: प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरचे केस ठराविक प्रमाणात नियमितपणे गळत असतात. पुढे काही काळानंतर त्यांच्या जागी नवे केस येऊ लागतात. पण जेव्हा गळालेल्या केसांच्या जागी नव्या केसांचे उत्पादन होणे बंद होते, त्यावेळेस केस गळतीची समस्या सुरु झाली असे म्हटले जाते. भारतामधील असंख्य लोक या समस्येचा सामना करत आहेत. खराब लाइफस्टाइल, चुकीच्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश अशा अनेक कारणांमुळे केस गळतीची समस्या उद्भवते. व्हिटामिन बी १२ या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळेही केस गळायला लागतात असे म्हटले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिटामिन बी १२ शरीरासाठी आवश्यक का असते?

मानवी त्वचेमध्ये लाखो सूक्ष्म छिद्रे असतात. यातील काही जागी छिद्रांमधून केस उगवतात. या सूक्ष्म छिद्रांना पोषण देण्याचे काम व्हिटामिन बी १२ करत असते. यामुळे केसांची वाढ होण्यास देखील मदत होते. हे व्हिटामिन मुबलक प्रमाणात असल्याने डोक्यावरची त्वचा निरोगी राहते. त्यासह टाळूचा भाग देखील मजबून बनतो. शरीरात व्हिटामिन बी १२ आवश्यक प्रमाणात असल्याने केस लांब, दाट आणि घनदाट बनतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vitamin b12 deficiency can casue hair loss know importance and other details yps
First published on: 20-03-2023 at 09:11 IST