अनेक जण बाहेरचं हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंटमधील जेवण आवडीने खातात. तर काहींना ऑनलाईन किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ आवडतात. परंतु बाहेर खाण्याची ही पद्धत तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. होय, कारण बाहेरील अन्नपदार्थांमध्ये अनेकदा भेसळ किंवा स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. यामुळे अन्नातून होणारी विषबाधा आणि पोटाचा संसर्ग यांसारख्या आजारांना बळी पडू शकता. यात विशेषत: पालेभाज्यांपासून तयार केलेले पदार्थ खाणं तुम्ही टाळल पाहिजे. कारण पालेभाज्यांमध्ये अनेकदा वेगवेगळे गवत आणि इतर रानभाज्या देखील असतात ज्या नीट साफ न करताच बनवल्या जातात. त्यामुळे तुम्ही विविध आजारांना बळी पडू शकता.

यामुळे पालकाची भाजी किंवा कोणत्याही पालेभाज्या हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर खाणं आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. कारण रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूडमध्ये पाले भाज्यांमध्ये बरसीम गवताची भेसळ असू शकते. हे गवत प्राण्यांचे खाद्य आहे त्यामुळे हे जर मानवाने खाल्ले तर पचनसंस्था बिघडू शकते. तसेच अपचन, गॅस आणि जुलाब होऊ शकते.

BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार
Air Force School in Pune
पुण्यातील एअरफोर्स स्कुलमध्ये विविध पदांसाठी होणार भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, ५६०००पर्यंत मिळू शकतो पगार

यासोबत पालेभाज्यांमध्ये अनेकदा तण किंवा जंगली गवतही असते. अनेक हॉटेल किंवा रेस्टॉरंटवाले ह्या भाज्या नीट साफ न करता, न धुता वापरतात. यामुळे अनेक सूक्ष्मजंतू किंवा कीटक त्यात राहू शकतात यामुळे तुम्हाला विविध आजारांचा धोका निर्माण होतो. याशिवाय अनेक ठिकाणी पालकासोबत मुळ्याची पाने, कोबीची पाने आणि इतर गोष्टींचीही भेसळ असू शकते. हे आपल्या पोटासाठी घातक ठरू शकते.

खराब पालेभाज्यांमुळे अनेक आजार होऊ शकतात. या भाज्या नीट साफ न करता, न धुता वापरल्याने पोटात जंतू होऊ ते मेंदूपर्यंत जाऊ शकतात. अशापरिस्थितीत गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी हॉटेलमधील पालेभाज्या खाणे शक्यतो टाळल्या पाहिजेत.