उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा आजार आहे. त्याचे प्रमाण आणि वाढ दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. खराब जीवनशैली, तणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उन्हाळ्यात हा आजार अधिक त्रासदायक ठरतो. उन्हाळ्याच्या दिवसात लोकांचा रक्तदाब खूप जास्त असतो, त्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. काही वेळा उच्च रक्तदाबामुळे रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात अंदाजे १.१३ अब्ज लोकं उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. WHO नुसार २०१५मध्ये, ५ पैकी १ महिला आणि ४ पैकी १ पुरुषांना उच्च रक्तदाब होता. २०२० च्या पुनरावलोकनाने असा निष्कर्ष काढला आहे की उच्च रक्तदाब हा जगभरातील हृदयविकार आणि अकाली मृत्यूसाठी प्रमुख जोखीम घटक आहे.

Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…

उन्हाळ्याच्या दिवसात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे, वाढत्या तापमानाचा परिणाम रक्तदाबाच्या रुग्णांना अडचणीत आणू शकतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, अशा लोकांना डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते, कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी उन्हाळ्यात स्वत:ला थंड ठेवा आणि असे अन्न खा जे बीपी नियंत्रणात ठेवते. उन्हाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये कोणत्या फळांचा समावेश करावा ते जाणून घेऊया.

केळ

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नाश्त्यात केळी खावी. केळी हे सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेले फळ आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नाश्त्यात केळी खावी, याने रक्तदाब नियंत्रणात राहील.

सफरचंद खा

सफरचंद खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. सफरचंदांमध्ये विरघळणारे फायबर चांगले असते, जे एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते.

बेरी खा

ब्लड प्रेशरच्या रुग्णांना अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त असलेल्या बेरीचे सेवन केल्याने फायदा होतो. बेरीमध्ये असलेले अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट रक्तातील नायट्रिक ऑक्साइडची पातळी वाढवते, ज्यामुळे ते खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो.

आवळा रक्तदाब नियंत्रित करतो

औषधी गुणधर्मांनी समृद्ध आवळ्याचा रस रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. रोज एक चमचा आवळ्याच्या रसात १ चमचा मध मिसळून सकाळ संध्याकाळ सेवन केल्यास फायदा होतो.