Drinking Fruit Juice: आजकाल अनेक लोक चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि गंभीर आजार टाळण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करत आहेत. त्यापैकी फळांचा रस पिणे हा निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा आनंद लोक अनेकदा दिवसाच्या सुरुवातीला, दुपारी किंवा संध्याकाळी घेतात. परंतु, अनेक लोकांना प्रश्न पडतो : उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये दररोज फळांचा रस प्यायल्याने रक्तदाब वाढेल का?
सर्वसाधारणपणे, फळांच्या रसात असलेल्या विविध पोषक घटकांमुळे तो चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. परंतु, त्याचा रक्तातील साखरेवरही परिणाम होऊ शकतो, जी अनेक प्रकरणांमध्ये चिंतेची बाब असते. फळांचा रस पिणे सामान्यतः आरोग्यासाठी फायदेशीर असते, परंतु त्याचे हानिकारक परिणाम तुम्ही त्याचे सेवन केव्हा आणि किती प्रमाणात करता यावर अवलंबून असतात.
फळांच्या रसाचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम प्रमाणापेक्षा किंचित जास्त असतो, म्हणजेच तो लवकर पचतो पण थोड्या काळासाठी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. फळ नैसर्गिक असले तरी तुम्ही रसाच्या स्वरूपात साखरेचे सेवन करत आहात, त्यामुळे हे सामान्य आहे.
फळापेक्षा फळांचा रस आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे का?
रस आणि संपूर्ण फळ यामध्ये लक्षणीय फरक आहे. संपूर्ण फळामध्ये फायबरसारखी अनेक पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. तथापि, रस काढताना, त्यातील फायबर काढून टाकले जाते आणि फक्त एक साखरेचा द्रव शिल्लक राहतो, यामुळेच फळांचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
फळांमधील फायबर इतके महत्त्वाचे का असते?
फळांचा रस बनवताना त्यातील फायबर काढून टाकले जाते, ज्यामुळे साखरेचे शोषण मंदावते. जेव्हा फायबर नसते आणि फक्त साखर असते, तेव्हा रसातील साखर लवकर शोषली जाते आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते, म्हणून जर तुम्ही त्याचे सेवन करत असाल किंवा सेवन करण्याचा विचार करत असाल, तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मधुमेह असलेल्यांनी ‘या’ फळांचे रस पिऊ नका
आंबा
आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असतं. एका आंब्यामध्ये जवळपास ४५ ग्रॅम नैसर्गिक साखर असते, त्यामुळे मधुमेहींनी कधीही आंब्याचं सेवन करू नये. तसंच जर त्यांना आंबा खाण्याची इच्छा झाली तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
चेरी
लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांना आवडणाऱ्या या फळामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साखर असते. एक कप चेरीमध्ये १८ ग्रॅम शुगर असते. मधुमेही व्यक्तींनी जर चेरी खाल्ली तर त्यांच्यासाठी ती धोकादायक आहे.
द्राक्ष
एक कप द्राक्ष खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेचं प्रमाण २३ ग्रॅमने वाढलं जातं, त्यामुळे जर मधुमेही व्यक्तींना द्राक्ष खाण्याची इच्छा झाली तर त्यांनी मर्यादित सेवन करावं.
लीची
सर्वाधिक जास्त नैसर्गिक असलेल्या फळांमध्ये लीची या फळाचा समावेश होतो. एक कप लीचीमध्ये २९ ग्रॅम नैसर्गिक साखर असते, जी रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवते, त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी या फळाचं सेवन कटाक्षाने टाळावं.
डाळिंब
डाळिंबामध्ये ४० ग्रॅम साखरेचं प्रमाण असतं, म्हणून मधुमेह रुग्णांना डाळिंब खाणं हानिकारक असते.
मधुमेह असलेल्यांनी कोणता रस प्यायला हवा?
भाज्यांपासून बनवलेल्या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि पोषक घटक जास्त असतात. उदाहरणार्थ पालक, काकडी आणि सफरचंद यांच्यापासून बनवलेल्या रसामध्ये साखरेचे प्रमाण सौम्य असते. काही आहारतज्ज्ञ म्हणतात की, हा पदार्थ डायबिटीस असलेल्या लोकांसाठी सुरक्षित मानला जातो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
