धावपळीच्या जीवनात, तणाव, नैराश्य आणि चिंता लोकांना वेळोवेळी घडते, परंतु कधीकधी त्यांना स्वतःला हाताळणे कठीण होते. तणावामुळे काही वेळा जुनाट आजारांची पुनरावृत्ती होण्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तणावाबद्दल बोलायचे तर हा एक मानसिक आजार आहे. जेव्हा आपल्या मनाची स्थिती आणि बाह्य परिस्थिती यांच्यात असंतुलन निर्माण होते. तेव्हा आपण तणावाने वेढलेले असतो. तणावामुळे अनेक मनोविकार निर्माण होतात. त्यामुळे मन नेहमी चंचल, अस्थिर राहते. अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनी अलीकडेच यूट्यूबवर तणाव टाळण्याच्या मार्गांबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. डॉ श्रीराम नेने म्हणतात की तणावामुळे जुनाट आजार आणि दाहक बदल होऊ शकतात. त्यांनी असे सात मार्ग सांगितले आहेत ज्याद्वारे तणाव टाळता येतो. तणाव टाळण्याचे मार्ग पुरेशी झोप घेणे प्रौढ वयात असलेल्या लोकांना किमान ७-९ तासांची झोप लागते, तर मुलांना १० तास किंवा त्याहून अधिक झोपेची आवश्यकता असते. झोपेच्या कमतरतेमुळे देखील तुम्हाला तणाव निर्माण होतो, त्यामुळे पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. दररोज व्यायाम करा तुम्ही दररोज व्यायामाकेल्यास मूड चांगला राहतो. ३० मिनिटे वेगाने चालणे आणि व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर आहे कारण ते एंडोर्फिन आणि डोपामाइन सोडते. हे हार्मोन्स प्रेरणा आणि मानसिक एकाग्रता म्हणून काम करतात. लोकांसोबत बोलणं चालणं ठेवा डॉ श्रीराम नेने यांनी यावेळी सुचवतात की एक सोशल सपोर्ट नेटवर्क तयार करा आणि लोकांशी नियमितपणे बोला. लोकांशी नियमित बोलण्याने तुम्हाला जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्यास मदत करेल. त्यामुळे तनाव देखील कमी होईल. महत्वाच्या गोष्टींना पहिले प्राधान्य द्या जी कामे फार महत्त्वाची नाहीत त्याकडे लक्ष देऊ नका किंवा प्राधान्य देऊ नका. लहान गोष्टी आधी करा. यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. सकारात्मक विचार करा चांगले विचार केल्याने चांगले घडते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तुम्ही एका दिवसात जे काही साध्य कराल ते सकारात्मकतेने स्वीकारा. आपण जे करू शकत नाही त्यावर लक्ष केंद्रित करू नका. मेडिटेशन करा डॉ श्रीराम नेने यांनी यावेळी संगितले की, तुम्ही पाच सेकंद दीर्घ श्वास घ्या, आणि रोखून धरा आणि नंतर श्वास सोडा. असे केल्याने तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल. तसेच हृदय गती कमी करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्ही नेहमी ध्यान करा याने मन अगदी प्रभावी राहते. तज्ञांशी बोला तुम्ही तणावाचा सामना करू शकत नसल्यास, मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी बोला. हे करणे नेहमीच चांगले असते कारण तज्ञ तुम्हाला योग्य सल्ला आणि उपचार देण्यास सक्षम असतील.तणावावर मात करण्यासाठी या उपायांचा नियमित सराव केल्यास फायदा होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)