महान कूटनीतिज्ञ आचार्य चाणक्य यांच्या नीति जगभर प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य एक महान राजकारणी, मुत्सद्दी आणि विद्वान होते. त्याचे जीवन त्याग, चिकाटी, धैर्य आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे. आपल्या रणनीतिने त्यांनी एका साध्या मुलाला चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवले होते. चाणक्य नीतिमध्ये चांगल्या, वाईट, मैत्री, व्यक्तीचे आचरण यासह अनेक पैलूंचा उल्लेख करण्यात आला आहे. असं मानलं जातं की, आचार्य चाणक्य यांची नीति वापरली की अपयश तुमच्या जवळ सुद्धा येत नाही. आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांचे सल्ले अत्यंत अचूक ठरतात. बर्याच प्रकरणांमध्ये त्यांचे शब्द आजही अचूक सिद्ध झाले आहेत. आचार्य चाणाक्य यांच्या मते, आयुष्यात कधीही तीन प्रकारच्या लोकांची मदत करू नये. कारण यामुळे तुमच्या आयुष्यात मान-सन्मानाला हानी पोहोचतेच, पण तुम्ही एका मोठ्या संकटात देखील सापडू शकता. मूर्खाशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च,दु:खिते सम्प्रयोगेण पंडितोऽप्यवसीदति। मूर्ख माणूस: या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य जी म्हणतात की, मूर्खांपासून नेहमी अंतर ठेवावं. कारण अशा लोकांना ज्ञान देणं म्हणजे गाढवासमोर गीता वाचल्यासारखं आहे. तुम्ही मूर्ख व्यक्तीच्या भल्याचा विचार केला तरी तो मूर्खपणाचे तर्क देईल. मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणं हा वेळ आणि शक्तीचा अपव्यय मानला जातो. वाईट स्वभावाची व्यक्ती: आचार्य चाणक्य लोकांना वाईट स्वभाव असलेल्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही चारित्र्यहीन व्यक्तीसोबत वेळ घालवला तर तुमची प्रतिमाही डगमगू शकते. म्हणूनच चाणक्य जी नेहमी वाईट स्वभावाच्या व्यक्तीपासून अंतर ठेवण्याचा सल्ला देतात. विना कारण दु:खी राहत असलेली व्यक्ती: आचार्य चाणक्यजींचा असा विश्वास आहे की, जो माणूस विनाकारण सतत दुःखी असतो, तो नेहमी इतरांच्या प्रगतीचा हेवा करत असतो. अशा लोकांमध्ये ईर्ष्याची भावना असते. तो प्रत्येकाला मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून, चाणक्य जी सल्ला देतात की विनाकारण सतत दुखी असलेल्या व्यक्तीपासून नेहमी अंतर ठेवा. चाणक्य जी म्हणतात की, अशा लोकांना नेहमी इतरांचा फायदा कसा घ्यायचा हे माहित असतं आणि ते काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला सोडून जातात.