ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्या व्यक्तीचं आयुष्य सोपं होऊन जातं असं म्हटलं जातं. कारण, पैशांमुळे अनेक समस्या सुटतात. आचार्य चाणक्यही गरीबी हे विषप्रमाणे असल्याचं सांगतात. गरीबीतून बाहेर येण्यासाठी लोक कधी कधी चुकीच्या मार्गाचा देखील वापर करण्यास धजावत नाही. चाणक्य नीतीमध्ये संपत्तीबाबत अशाच काही गूढ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हव्या. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये ठराविक मार्गाने मिळवलेली धन संपत्ती ही तुमच्या मान-सन्मानाच्या हानीचं कारणं ठरू शकतं. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

१. सदाचाराचं त्याग: आचार्य चाणक्यजी म्हणतात, व्यक्तीला पैसा कमवण्यासाठी जर सदाचाराचं त्याग करण्याची वेळ येत असेल तर अशा संपत्तीमुळे तुमचा सन्मान कमी होतो. अशा मार्गाने पैसे कमवताना फसवणूक केली जात असते. अशा कामांमधून मिळालेला पैसा तुमच्या संकटांत कधीच साथ देत नाही. पण याउलट तुमच्या मान-सम्मानाची हानी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आचार्य चाणाक्य सदाचार बाळगूनच धन संपत्ती कमावण्याचा सल्ला देतात.

२. शत्रूची चापलूसी करणे: आचार्य चाणक्य अशा संपत्तीला निरुपयोगी मानतात, जी संपत्ती शत्रूला चापलूसी करून कमावली गेली आहे. कारण असा पैसा मिळवून माणसाला नेहमीच अपमानित व्हावं लागतं.

३. अत्याचार सहन करणे: आचार्य चाणक्य मानतात की ज्या पैशासाठी एखाद्या व्यक्तीला अत्याचार सहन करावा लागतो तो त्याग करणं चांगलं. कारण असे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, जे पाहून तुमचे कुटुंब खूप दुःखी होतं.