उंदीर हा गणेशाचा वाहक मानला जातो. म्हणून मंदिरात गणपती बाप्पासोबत उंदराची श्रद्धेने पूजा केली जाते. मात्र गणपतीचा वाहक जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा तो घरातील सर्व वस्तूंचा नायनाट करून टाकतो. अगदी खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते डब्ब्यांपर्यंत आणि विजेच्या तारांपर्यंत सर्व काही कुरडून खराब करतो. यामुळे उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अनेकजण घराच पिंजऱ्यात विष टाकलेली भाकरी लटकवून ठेवतात. पण आता उंदरही हुशार झाले आहेत, पिंजऱ्यात न अडकता ते भाकरी सहज खाऊन जातात. अशापरिस्थितीत आज आम्ही तुम्हाला घरातील उंदरांपासून सुटका करुन घेण्यासाठी काही रामबाण उपाय सांगणार आहोत. ज्या मदतीने तुम्ही घरातील उंदीर न मरताच बाहेर जातील, जाणून घ्या उंदरांपासून सुटका करुन घेण्याचे ५ घरगुती उपाय

पेपरमिंट स्प्रे

उंदरांना पुदिन्याचा वास अजिबात आवडत नाही. यामुळे उंदीर ज्या जागी जातात, त्या जागी पेपरमिंट स्प्रे शिंपडा, उंदीर घाबरून ती जागा सोडून लगेच पळून जातील, या

Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

तंबाखू

आरोग्यासाठी तंबाखू हानिकारक असली तरी उंदरांना पळवून लावण्यासाठी उत्तम मानली जाते. यामुळे घरातील उंदरांच्या दहशतीमुळे हैराण असाल तर तंबाखूचा वापर करु शकता. बेसनात थोडा तंबाखू मिसळून तो उंदरांच्या जागेवर ठेवा, यामुळे सर्व उंदीर एकाचवेळी नाहीसे होतील.

तुरटी

उंदरांना पळवून लावण्यासाठी तुरटी पावडरची पातळ पोस्ट तयार करा. मग तुम्ही ही पेस्ट उंदरांच्या बिलांजवळ शिंपडा. यामुळे सर्व उंदीर जागा सोडून स्वतःहून पळून जातील.

लाल मिरची

जर तुमच्या घरात उंदीर येत-जात असतील तर ते ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी लाल तिखट टाका. यामुळे उंदीर पुन्हा त्या ठिकाणी येण्याचे धाडस करणार नाही.

कपूर

कापूरचा वास आल्यावर श्वास फुगायला लागतो. अशा परिस्थितीत कापूरचे तुकडे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे उंदीर अस्वस्थ होऊन घरातून पळून जातात.