पावसाळा ऋतू सर्वांना आवडतो. पावसाळ्यातील मातीचा सुगंध आणि वातावरणातील थंडावा सर्वांना हवाहवासा वाटतो. मात्र , पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच तो आरोग्य आणि सौंदर्याच्या समस्याही घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक संसर्ग पसरतात त्यामुळे आजारही उद्भवतात. यावेळी स्वतःची विशेष काळजी घेणं आवश्यक असते. पावसाळ्यात आपला सतत पाण्याशी संपर्क येत असतो. त्यामुळे पावसाळ्यात काही वेळा तुमचे पाय खराब होतात आणि त्यांचे सौंदर्य कमी होते. हे टाळण्यासाठी तुम्हाला पावसाळ्यात पायांची काळजी घेणं आवश्यक असते. तर जाणून घ्या पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी?

१) पावसाळ्यात दिवसातून तीन वेळा पाय साबण लावून कोमट पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर त्यांना थंड पाण्याने पुन्हा धुवा. कोरड्या टॉवेलने पाय वाळल्यानंतर, फूट क्रीम लावा आणि मसाज देखील करा. पाय घाण होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take special care of your feet in the rainy season know these 5 tips gps
First published on: 14-06-2022 at 17:12 IST