भारतात कडक उन्हाने हाहाकार माजवला आहे. उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले की कोणाचीही अवस्था दयनीय होऊ शकते. कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे भारतात उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. याला सनस्ट्रोक असेही म्हणतात. आज आपण उष्णतेपासून स्वतःचा बचाव कसा करायचा ते पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

>> उष्णतेमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ लागतात, ते परत मिळवण्यासाठी नारळपाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहतेच पण त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात.

>> उष्माघात टाळण्यासाठी नेहमी कांद्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी कांद्याची पेस्ट तयार करून कपाळावर चोळा. कांद्याचा रस छातीवर, चेहऱ्यावर आणि कानाभोवती लावू शकता. कांद्याच्या विशेष गुणधर्मामुळे तापमान नियंत्रणात ठेवले जाते.

गालावर खळी असणाऱ्या मुलींमध्ये असते ‘ही’ खास गोष्ट; देवी लक्ष्मीची असते विशेष कृपादृष्टी

>> उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास, सूर्य आणि गरम वारा यांचा विपरीत परिणाम होतो. पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान व्यवस्थित राहते आणि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही.

>> कैरीचे पन्हे उन्हाळ्यात आवडीने प्यायले जाते. ते तयार करण्यासाठी आंबा गरम पाण्यात किंवा मंद आचेवर शिजवा. नंतर त्याचा गर मिक्सर ग्राइंडरमध्ये मीठ आणि आले सोबत एकत्र करून घ्या. पन्ह प्यायल्यानंतर उन्हात बाहेर गेल्यास उष्णता जाणवणार नाही.

>> दही आणि मीठापासून बनवलेले ताक उन्हाळ्यात टॉनिकपेक्षा कमी नाही. यामुळे शरीर थंड होते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips how to avoid heatstroke in summer learn effective home remedies pvp
First published on: 08-05-2022 at 12:29 IST