मधुमेह हा एक जुनाट आजार आहे, ज्याच्या रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या या आजारात स्वादुपिंड इन्सुलिनचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू लागते. रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होण्याला हायपरग्लायसेमिया म्हणतात. रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ वाढल्याने शरीराच्या अनेक अवयवांचे नुकसान होते. मधुमेह वाढत असताना केवळ हृदय, मूत्रपिंड आणि फुप्फुसांनाच नुकसान होत नाही तर त्याचा त्वचेवरही परिणाम होतो.

मधुमेही रुग्णांमध्ये जेव्हा साखरेची पातळी २०० मिलीग्राम/डीएलपेक्षा जास्त होते तेव्हा त्याचा परिणाम हातांवरही दिसून येतो. साखर वाढल्याने हातात असह्य वेदनांच्या तक्रारी वाढू शकतात. हातात कडकपणा आणि हातांच्या स्नायूंमध्ये वेदना होतात. बोटांमध्ये असह्य वेदना होतात. सकाळी हातांमध्ये ही समस्या अधिक तीव्र असते. मधुमेही रुग्णांमध्ये साखरेची पातळी २०० मिलीग्राम/डीएल पेक्षा जास्त झाल्यावर हातात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.

बोटांमध्ये कडकपणा:

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने बोटांमध्ये कडकपणा येऊ शकतो. हा कडकपणा इतका तीव्र होऊ शकतो की बोटे वाकवणेदेखील कठीण होऊ शकते. जर सकाळी तुमच्या बोटांना वेदना होत असतील आणि अंगठा वाकवणेदेखील कठीण होत असेल तर ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे.

हाताच्या तळव्याला खाज सुटणे:

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त असते तेव्हा मधुमेहींना त्यांच्या तळहातांमध्ये तीव्र खाज सुटते, त्यांच्या हातांची त्वचा कोरडी आणि चपळ होते. जास्त खाज येणे हे मधुमेह होण्याचे लक्षण असू शकते.

नखांना नुकसान आणि नखाभोवती सूज:

वाढत्या मधुमेहाचे परिणाम नखांच्या क्यूटिकल्सवर सर्वात आधी दिसून येतात. मधुमेह वाढत असताना नखांभोवती सूज येऊ लागते. नखांचा रंग खराब होऊ लागतो. नखं पिवळी किंवा काळी पडतात, नखं खराब झालेली दिसू लागतात