होळी या सणाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या प्रियजनांसोबत मजामस्ती आणि स्वादिष्ट पक्वान्न यांच्यामुळे लोक उत्सुकतेने दिवस मोजतात. या वर्षाबाबत बोलायचं झाल्यास १८ मार्च २०२२, शुक्रवारी रंगपंचमी साजरी केली जाईल. होलिका दहन १७ मार्चच्या रात्री केले जाईल. असे मानले जाते, भक्त प्रल्हादची भक्ती आणि भगवान विष्णू यांच्याद्वारे प्रल्हादाच्या प्राणांची केलेली रक्षा याचा आनंद व्यक्त करण्यासाठी होळी हा सण साजरा केला जातो.

होलिका दहनाची शुभ वेळ आणि पद्धत

यावर्षी होलिका दहन करण्यासाठीचा शुभ मुहूर्त १७ मार्च २०२२, गुरुवारी रात्री ९ वाजून २० मिनिटे ते १० वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच होलिका दहन करण्यासाठी फक्त १ तास १० मिनिटांचा अवधी असेल. होलिका दहन करण्यासाठी हवेशीर ठिकाणी एक जागा निश्चित करून, सुकलेली लाकडे, पालापाचोळा, गोवऱ्या यांचा ढीग करतात. मग शुभ मुहूर्तावर त्याची पूजा करून ते जाळतात. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Loksatta tatva vivek Popularization of Western philosophy
तत्व विवेक: पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं लोकाभिमुखीकरण
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Attempt to spread poison in the name of caste PM Modi criticizes opponents
जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

होलिका दहनामागील पौराणिक कथा

धर्म-पुराणांनुसार असुर राजा हिरण्यकश्यपू याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा भक्त होता. असुर राजाला ही गोष्ट आवडत नसे. त्याने आपल्या मुलाला भगवान विष्णूची भक्ती करण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाय केले. परंतु जेव्हा तो प्रत्येक वेळी अपयशी ठरला तेव्हा त्याची बहीण होलिकाने ही जबाबदारी स्वतःवर घेतली. होलिकाला वरदान मिळाले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही. त्यामुळे प्रल्हादला मारण्यासाठी तिने त्याला आपल्या मांडीवर घेऊन आगीत प्रवेश केला. यावेळी प्रल्हाद भगवान विष्णूचे स्मरण करत राहिला. तो वाचला पण होलिका त्या आगीत जळून मरण पावली. तेव्हापासून, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला दुष्टांच्या अंताचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते.

Story img Loader