आयुर्वेदीय ग्रंथकारांनी पोटाच्या वाताच्या विविध त्रासानंतर ‘हृदयरोग’ व्याधीचा क्रम लावलेला दिसून येतो. गुल्मानंतर हृदयरोगाबद्दल विस्तृतीकरण करण्यामागे पोटाचा आणि हृदयाचा संबंध स्पष्ट होतो. प्रत्यक्षात असंख्य वेळेस हृदयाची आशुकारी अवस्था पोटाच्या विकारांची लक्षणे निर्माण होऊन आलेली दिसते. पोटफुगी, ढेकर, छातीत जळजळ, छातीत आग होणे, मुलप्रवृत्ती न होणे, त्याबरोबरच हृदयाच्या ठिकाणी जड होणे, पाठ दुखणे, अस्वस्थता, कधी उलटी या लक्षणांसह हृदयाच्या विकृतीची अवस्था निर्माण होते. यावरून उदारास्थ व्याधींचा संबंध स्पष्ट होतो. दुसऱ्या बाजूने विचार केल्यास पोटाच्या विकारांवर मात न केल्यास योग्य प्रकारे पथ्य न पाळल्यास हृदयरोग निर्माण होऊ शकतो असेही म्हणता येईल, तसेच हृदयरोग ही एक प्राणघातक ठरणारी व्याधी असून लक्षणे अंगावर काढत राहिल्याने अतिप्रकारचा आत्मविश्वास स्वत:वर ठेवल्याने जिवावर बेतते, याची असंख्य उदाहरणे आहेत. म्हणून योग्य प्रकारे दक्षता, उपचार, पथ्य पाळून शरीर संरक्षण करावे. हृदयरोगाचे असंख्य प्रकार आयुर्वेदीय ग्रंथांनी वर्णन केले असून स्थूल प्रकारे सर्व हृदयरोगांसाठी पथ्य-अपथ्य वर्णन केले आहे. गार पाणी, अतिथंड पाणी, साठवून ठेवलेले पाणी, अशुद्ध पाणी हृदयरोग असताना टाळावे. मोठय़ा शहरांमध्ये काही घरांमध्ये फ्रीजमधील थंड पाणी तात्काळ पिण्याची सवय असते हे सर्वप्रथम टाळणे महत्त्वाचे ठरते. थंड व गरम एकाच वेळी खाणे हृदयरोग्यांना त्रास देणारे असून विरुद्धाहार टाळणे गरजेचे दिसून येते.

हृदयरोगाचे अपथ्य पाहताना खूप व्यक्तींच्या मनात द्विधा निर्माण झाली असेल. हृदयरोग्याच्या अपथ्यांमध्ये आयुर्वेद शास्त्रकारांनी केवळ साठणारी चरबी, वाढणारी चरबी, रक्त वाहिन्यांची विकृत अवस्था असा एकात्मिक विचार केला नसून, हृदयाशी संबंधित सर्वच पदार्थाचा विचार केलेला दिसून येतो. या अपथ्य आहाराच्या पालनामुळे अनेक रुग्णांना सकारात्मक लाभ झालेला दिसून येतो. हृदयरोगींनी केवळ दूध सेवन करू नये. धारोष्ण दूध सेवनाला निषिद्ध मानले असले तरी सध्या धारोष्ण दूध घेणाऱ्यांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी असेल. थंड दूध या रुग्णांनी पूर्णत: टाळावे. (हृदयरोगामध्ये छातीत आग होत असताना थंड दूध घेण्याची प्रथा आहे, ती चुकीची आहे.) दुधापासून निर्माण होणारे खव्याचे प्रकार, अगदी प्रसादसुद्धा हृदयरोगींनी टाळणे आवश्यक ठरते. सध्याच्या काळात प्रचलित झालेला ‘पनीर’ हा प्रकार हृदयरोगींना अत्यंत त्रासदायक असून चीज, बटरही टाळावे. हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी दहीसुद्धा सेवन करण्यास शास्त्राचा विरोध आहे. अतिशय गरम, अतिशय थंड जेवण टाळावे, तर थंड-गरम एकाचवेळी सेवनही टाळावे. शिळे अन्न तर खाऊ नये आणि मोह आवरून ‘चाट’चे सर्व प्रकार हृदयरोग असताना सेवन करू नयेत. यामध्ये भजी, डाळ, वडे आदी प्रकारही समाविष्ट आहेत. वाळलेले मांस, वाळवलेल्या भाज्या, फ्रीजमधील भाज्या, वाळवलेली चवळी,

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज

वाटाणे, वाल ही कडधान्ये सेवन करू नये. अत्यंत चमचमीत पदार्थ या रुग्णांनी टाळलेले उत्तम. कधी कधी कंटाळा आला म्हणून

हे ‘चाट’ घरी करून या व्यक्ती सेवन करतात. पण विसरू नका गुणधर्म हृदयाला घातकच राहतात!

* हृदयरोगामध्ये मका आणि मक्याचे सर्व प्रकार टाळणे गरजेचे आहे. कारण यामुळे हृदयरोगाचा त्रास वाढताना दिसून येतो.

* बाजरी, नाचणी, तांदूळ आदी कोरडी धान्ये तसेच ज्वारीही हृदयरोगामध्ये टाळण्याचा सल्ला शास्त्रकारांनी दिला आहे.

* हृदयरोगी कुरमुऱ्यासारखे पदार्थही खूप प्रमाणात खाताना आढळतात. त्यांनीही ते टाळणे आवश्यक आहे.

* विविध प्रकारच्या डाळींनाही शास्त्राने विरोध केला असून वाटाणे, राजमा, उडीद डाळ, मटकी, मटार, चवळी, छोले हे पदार्थ पूर्णत: टाळावेत. या पदार्थाचे सेवन हृदयरोगाची लक्षणे तात्काळ वाढवताना दिसून येते.

* मिसळसारखा महाराष्ट्रात प्रचलित असलेला पदार्थ हृदयरोगी व्यक्तींनी टाळणे आवश्यक ठरते. यामधील पोहे, साबुदाणा, बटाटे हे पदार्थही हृदयरोगी व्यक्तींना अपथ्यकारक आहेत.

* उपवास करणाऱ्या हृदयरोगी व्यक्तींना अपथ्यकारक आहेत. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी साबुदाणा, भगर, रताळीही टाळावी. या पदार्थाच्या सेवनाने तात्काळ हृदयाच्या लक्षणांमध्ये वाढ झालेली दिसून येते.

* आंबट, तुरट तसेच अतिगोड फळांच्या सेवनाने हृदयरोगाची अवस्था बळावते.

* जांभुळ, कलिंगड, फणस, सीताफळ, स्ट्रॉबेरी, तुती, ब्लॅक बेरी, अननस, बोरे, कच्ची केळी तसेच सफरचंद हे शास्त्र सल्ल्याने टाळावे.

* विविध प्रकारच्या पालेभाज्या हृदयरोग्यांनी टाळाव्यात किंवा खाऊ नयेत.

* शेवग्याच्या पानांना व फुलांनाही आयुर्वेदाने विरोध केला आहे. डांगर व कारली यांचे सेवनही हृदयरोगी व्यक्तींना त्रासदायक ठरते.

* पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खाण्यास मज्जाव आहे, तर मेंढी, डुकराचे मांस खाणाऱ्या हृदयरोगींनी ते खाण्याचा मोह टाळावा.

हृदयरोगात तूप

आयुर्वेद शास्त्रकारांनी ‘तूप’ हृदयरोगाच्या प्रकारांमध्ये खाण्याचा सल्ला दिला आहे. (हे वाक्य अनेकांना धक्का देणारे ठरू शकते!) किंबहुना हृदयरोगाच्या चिकित्सेमध्ये विविध प्रकारची औषधी गुणयुक्त ‘सिद्ध धृत’ हृदयरोग बरा करण्यासाठी वापरलेली दिसून येतात. पथ्य-अपथ्याच्या या प्रवासात आयुर्वेद शास्त्रकारांनी ज्या ज्या ठिकाणी जे जे खायला सांगितले आहे ते ते ‘अपथ्य’ (म्हणजे व खाण्याच्या गोष्टी पाळल्यास) तंतोतंत पाळल्यास काय खावे हे स्पष्ट होते. म्हणजेच हृदयरोगामध्ये न खाण्याच्या गोष्टी वा पदार्थ खाऊन त्याबरोबर केवळ तूप खायला सांगितले म्हणून हे खाणे चुकीचे आहे. तूप खायला सांगताना तुपाचा हृदयावर अहितकारक गुणात्मक परिणाम नाही आणि तूप स्नेह द्रव्यांमधील श्रेष्ठ व शरीरस्वास्थ्याला हितकारक असल्याने आग्रह केला आहे. ताजे तूप हे स्मृती वाढवणारे, ग्रहणशक्ती, ज्ञानशक्ती, आयुष्य आणि शुक्र वाढवणारे आहे. डोळ्यांसाठी अत्यंत हितकारक असून बाल, वृद्ध आदींची कांती सुकुमारता वाढवणारे स्वर्माधुर्यादायक ठरते. क्षीण झालेल्या व्यक्तींसाठी, नागीण, कांजिण्या या व्याधींवर तसेच चक्कर यावर अत्यंत हितकारक आहे. वात-पित्त यांची विकृती दूर करणारे, जीर्ण ज्वरावर तसेच दारिद्रय़नाशक असल्याचे शास्त्रीय वाचन आहे. योग्य प्रकारे धृताची योजना केल्यास अत्यंत उपयुक्त कार्य करणारे ठरते, असेही शास्त्र म्हणते. म्हणजे ‘तूप’ इतर स्नेहद्रव्यांना टाळून वरील गुणांसाठी सेवन करण्याचा सल्ला शास्त्राचा दिसून येतो. दुसरे त्याची मात्रा हे व्यक्तीप्रकृती, अवस्थेप्रमाणे ठरवण्याचाही सल्ला शास्त्राने दिला आहे, एवढे मात्र नक्की!

(क्रमश:)

वैद्य विक्रांत जाधव