नको त्या ठिकाणी चट्टे उठलेत, खाज येतेय, ओशाळवाणे वाटतेय.. मग अमुक-तमुक मलम लावा.. या आणि अशा प्रकारच्या जाहिराती सर्रास दिसतात. त्यांना प्रतिसादही खूप मिळतो. मात्र घाम किंवा ओलसरपणामुळे कंबर, जांघेत, स्तनांच्या खाली निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गासाठी (फंगल इन्फेक्शन) जाहिरातीत दाखवणारी मलम लावूनही संसर्ग बरा होत नाही, असा अनुभव हल्ली अनेक जणांना आला असेल. हा संसर्ग बरा का होत नाही आणि औषधे घेऊन बरा झालेला संसर्ग पुन्हा का उद्भवतो याबाबत तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुरशीचे जिवाणू आजूबाजूच्या वातावरणामध्ये, प्राण्यांच्या त्वचेवर, मातीमध्ये असे सर्वत्र असतात. त्वचेच्या ज्या भागामध्ये ओलसरपणा किंवा तापमान वाढते तिथे या जिवाणूंची वाढ होऊन संसर्ग निर्माण होतो. नायटा किंवा गजकर्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संसर्गामध्ये कंकणाकृती चकत्यांपासून ते मोठय़ा आकाराचे लाल, काळसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसून येतात. या चट्टय़ाच्या आजूबाजूंना बारीक फोड येत असतात आणि त्यांना प्रचंड खाज येते. विशेषत: घाम किंवा ओलसरपणा असणारा मांडीचा आतला भाग, जांघेत, महिलांमध्ये छातीच्या खालच्या बाजूस असा संसर्ग आढळून येतो. परंतु हल्ली अगदी चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या कोणत्याही भागावर हा संसर्ग दिसून येत आहे.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skin diseases
First published on: 11-09-2018 at 02:00 IST