उन्हाळय़ात कितीही पाणी प्यायले तरी तहान भागत नाही. जेवढी थंड पेये पिऊ तेवढा घशाचा शोष वाढतच जातो. त्यासाठी थंड पिण्याऐवजी कोणतेही कोमट किंवा गरम पेय घ्यावे. याशिवाय.. * साध्या पाण्यात लिंबाचे, आवळय़ाचे, कोकमाचे, वाळय़ाचे सरबत किंवा कैरीचे पन्हे चालेल. फक्त या सर्वामध्ये थोडा आल्याचा वापर करावा. * शहाळय़ाचे पाणी किंवा धने-जिरे व खडीसाखर यांचे पाणी चालेल. आले-लिंबू घातलेला पण बर्फाशिवाय उसाचा रस चालेल. * घसा खूप सुकत असेल तर खडीसाखर किंवा गूळ चघळून वर पाणी प्यावे किंवा साध्या थंड दुधात घरचे लोणी विरघळवून प्यावे. * दुधाचा मसाला घालून थंड दूध किंवा धने-जिऱ्याची पावडर टाकून ताक प्यावे. * सायीसकट दूध + आंब्याचा रस + खडीसाखर + वेलची पूड मिक्सरमध्ये एकत्र करून ते फ्रीजमध्ये न ठेवता प्यावे. * सर्दी-खोकला, दमा नसलेल्यांनी किंवा सहा वर्षांखालील मुलांनी सोडून, समोर काढून दिलेल्या ताज्या फळांचा, बर्फ न घालता रस घ्यावा. * उन्हाळय़ातील तहान भागविण्यासाठी मातीच्या भांडय़ातील (माठातील) पाणी केव्हाही चांगले! - वैद्य राजीव कानिटकर मोजमाप आरोग्याचे : राज्यातील आरोग्य संस्था आरोग्य संस्थेचा प्रकार संख्या * उपकेंद्रे १०,५८० * फिरती आरोग्य पथके १३ * प्राथमिक आरोग्य केंद्रे १,८११ * ग्रामीण रुग्णालये (३० खाटा) ३६० क्षमतेनुसार उपजिल्हा रुग्णालये अ) ५० खाटा ५८ ब) १०० खाटा २८ * सामान्य रुग्णालये ४ * अस्थिरोग रुग्णालये १ * जिल्हा रुग्णालये २३ * सुपर स्पेशालिटी रुग्णालये २ * मनोरुग्णालये ४ * स्त्री रुग्णालये ११ * क्षयरोग रुग्णालये ४ * कुष्ठरोग रुग्णालये ४ * आरोग्य व कुटुंब कल्याण ८ प्रशिक्षण संस्था (स्रोत : आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य.)