विविधतेने नटलेला विदर्भ हा नैसर्गिक, धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. विदर्भातील अनेक प्रसिध्द ठिकाणांपैकी एक म्हणजे चिमूर येथील श्री बालाजी मंदिर. महाराष्ट्राचे तिरुपती या नावाने प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे असेलेले बालाजी देवस्थान. याला श्रीहरी बालाजी असे म्हणतात. तिरुपतीच्या बालाजीला बोललेला नवस इथे फेडलेला चालतो, पण या बालाजीला केलेला नवस तिरुपतीला फेडले जात नाहीत, ते इथेच फेडावे लागतात, असा समज आहे. कथा आहे इ. स. १७०४ ची. चिमूर येथील शेतकरी भिकुजी डाहुले पाटील यांनी जनावराच्या गोठय़ासाठी जमीन खणायला सुरूवात केली असता एके ठिकाणी कुदळ आदळले आणि धातूसारखा आवाज आला. भिकू पाटील यांनी खोदणे थांबवले. त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नानुसार त्यांनी पुन्हा जमीन खोदण्यास सुरूवात केली आणि तिथे एक सुंदर मूर्ती वर आली. तिची प्रतिष्ठापना त्याच ठिकाणी करण्यात आली, अशी अख्यायिका आहे. पुढे इ. स. १७५७ मध्ये जानोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजीपंत चोरघडे यांच्या विनंतीवरून चिमूर इथे २०० एकर जमीन मंदीर उभारण्यासाठी दिली. तटबंदीयुक्त प्रासाद असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असून त्यावर कोरीवकाम केलेले आहे. लाकडी सभामंडपाला १२ खांब आहेत. त्यावर हत्ती, वाघ अशा प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत. याच्या पुढे चार दगडी खांब असलेला अजून एक सभामंडप आहे. त्याला वर आधारशिळा बसवलेल्या आहेत. बालाजीची मूर्ती बरीचशी तिरुपतीच्या मूर्तीसारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरुड खांब असून बाहेर काही पुजारी मंडळींच्या समाध्या दिसतात. या ठिकाणी माघ शुद्ध पंचमीला बालाजीची घोडायात्रा भरते. एका रथावर लाकडी घोडा ठेवून त्यावर बालाजीच्या मूळ मूर्तीची लाकडी प्रतिकृती ठेवतात व त्याची मिरवणूक काढली जाते. इतके महत्त्वाचे देवस्थान आपल्या राज्यात आहे, याची स्थानिकांव्यतिरिक्त इतरांना फारशी माहिती नाही. विदर्भातील पर्यटनात एक दिवस राखून ठेवून चिमूरच्या बालाजीचे दर्शन घेता येईल.

आवाहन – वाचक सहभाग
वाचक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहित नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.
ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलिकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा.
भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.
आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१० ई-मेल – lokbhramanti@gmail.com

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?