सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक जीवनाचा मानिबदू आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या कित्येक मंडळांना शंभर वर्षांपेक्षाही मोठी परंपरा आहे. एखादा सार्वजनिक उपक्रम सातत्याने अनेक वर्षे चालवणे ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच ‘लोकप्रभा’ने या अंकात शताब्दीचा टप्पा पार केलेल्या गणपती मंडळांचा आढावा घेतला आहे. त्याबरोबरच या वर्षी पंच्याहत्तर, साठ, पन्नास तसंच पंचवीस वर्षे साजरे करणाऱ्या गणपती मंडळांचा आढावा घेतला आहे.