विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच!’’ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे उद्गार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनावर बालपणीच कोरले गेलेले असतात. टिळकांनी सुरू केलेले केसरी वर्तमानपत्र आपल्याला लक्षात आहे. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’ हा बाणेदारपणाही तेवढाच लक्षात राहातो. टिळकांवर ब्रिटिश सरकारने चालविलेला राजद्रोहाचा खटला आणि त्या संदर्भात शिक्षा होत मंडालेला झालेली रवानगी, गीतारहस्यचे लिखाण एवढेच टिळक आपल्याला बव्हंशी माहीत असतात.  स्वातंत्र्यसंग्रामातील या जाज्वल्य नेत्याची स्मृतिशताब्दी आजपासून देशभरात पाळली जाणार आहे. यानिमित्ताने शालेय क्रमिक पुस्तकापलीकडे टिळक समजून घेणे महत्त्वाचे ठरावे. अगदी वानगीदाखल घ्यायचे तर लोकमान्य टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्याची माहिती असली तरी त्या खटल्यात लोकमान्यांनी कायद्याचा अभ्यास करून स्वतच युक्तिवाद करत स्वतची बाजू मांडली हे फारच कमी जणांना माहीत असते. ते केवळ कायद्याचे अभ्यासक नव्हते तर ते उत्तम खगोलविद होते. खगोलशास्त्राच्याच आधारे वेदांची कालनिश्चिती करण्याचा संशोधनप्रकल्प त्यांनी एकहाती तडीस नेला. हे काम सोपे खचितच नव्हते. याचबरोबर ते उत्तम अर्थतज्ज्ञही होते. राजद्रोहातील खटल्यानंतर टिळक परत येणारच नाहीत, असे ब्रिटिशांना वाटले होते. मात्र लोकमान्य त्याला पुरून उरले. मंडालेहून परतल्यानंतर तर त्यांनी स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क असल्याचा पुकारा केला आणि स्वातंत्र्यसंग्रामही अधिक जाज्वल्य केला.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanya tilak mathitartha dd70
First published on: 31-07-2020 at 03:13 IST