विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
सायंकाळच्या वेळेस सारे चिडीचूप होत असताना ९ मार्च रोजी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अचानक एक क्षेपणास्त्र भारतातून अपघाताने डागले गेले. सिरसाहून निघालेले हे क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या महाजन फायरिंग रेंजच्या दिशेने ४० हजार फूट उंचीवरून जात असतानाच ८० किलोमीटर्सचे अंतर पार केल्यानंतर अचानक क्षेपणास्त्राने दिशा बदलली. त्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे १०० किलोमीटर्स आतमध्ये हे क्षेपणास्त्र आदळले. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने पत्रकार परिषद घेत ही घटना जगजाहीर केली.  तर त्यानंतर भारताने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत अपघातानेच हे घडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून दोन्ही देशांतर्फे  संयुक्त चौकशीची मागणी केली. हा घटनाक्रम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण गेल्या सुमारे सहा महिन्यांमध्ये भारत- पाक संबंधांमध्ये झालेल्या बदलांचा प्रभाव या घटनेवर स्पष्ट पाहायला मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानने त्यांचे संरक्षण धोरण जाहीर केले त्यात भारतावर हल्ला करणे हा आपला हेतू नाही, असे प्रथमच म्हटले. हा बदल अनेकांसाठी धक्कादायक होता. त्याचे विश्लेषण यापूर्वीच ‘मथितार्थ’मध्ये केले आहे.  मात्र धोरण केवळ कागदावर बदललेले नाही तर प्रत्यक्षातही त्याचा प्रभाव आहे, हे या घटनेनंतर स्पष्ट झाले. एरवी आक्रस्ताळ्या पाकिस्तानकडून फारशा संयमाची अपेक्षा कधीच राखता येत नव्हती. मात्र हे प्रकरण पाकिस्तानने अधिक संयमाने हाताळले हे जेवढे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा अंमळ अधिक भारतासाठी महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India accidentally fired missile falls in pakistan dd
First published on: 18-03-2022 at 07:59 IST