विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण नेहमीच निवडणुकांकडे पाहात आलो आहोत. तर असा हा लोकशाहीचा उत्सव येत्या महिन्याभरात देशातील पाच राज्यांमध्ये साजरा होणार आहे. यात राजकारणातील पळवापळवी आणि कुरघोडी ही तशी काही फारशी नवीन नाही. डाव नेहमीचाच, कधी खेळगडी बदलतात इतकेच. एरवी लोकशाहीच्या नावे आपण भलीमोठ्ठी भाषणे करतो, जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचे दाखलेही देतो आणि अभिमानाने अंमळ छातीही फुलवतो; पण ही खरोखरच लोकशाही आहे का, योग्य दिशेने जाणारी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्ष मग तो कोणताही असो, केंद्रातील सत्ताधारी भाजपा किंवा मग विरोधात असलेले काँग्रेस, आप किंवा मग तृणमूल काँग्रेस वा अकाली दल. नेता किंवा उमेदवार निवडीचा एकच निकष असतो तो म्हणजे निवडून येण्याची क्षमता. ही क्षमता ठरते कशी? तर कोण कोणत्या जातीचा आणि त्या जातीचे मतदार हे मतदारसंघात संख्येने किती आहेत यावर. समीकरण जातीचे मांडायचे आणि गप्पा निकोप लोकशाहीच्या करायच्या असा हा विरोधाभास आता दर निवडणुकांमध्ये तसा रोजचा झालाय. जातिभेद न मानणारी राज्यघटना तोंडी लावण्यापुरती प्रत्येक पक्ष वापरतो, अनेकदा जातिअंताबद्दलही भाषणे ठोकली जातात आणि मग लोकशाहीच्या उत्सवात जातपंचायतच बसते वेगळय़ा प्रकारची प्रत्येक पक्षात. हा देखावा दर निवडणुकीत सर्वच पक्षांत समान पाहायला मिळतो. याबाबतीत मात्र सर्वच पक्षांमध्ये एकवाक्यता दिसते. जातीचे वर्चस्वच नेतृत्व ठरवणार असेल तर मग जातिअंताच्या गप्पा तरी का माराव्यात?

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian democracy republic day elections mathitartha dd
First published on: 22-01-2022 at 08:48 IST