विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमाप कर्जे  हे त्याचे एक महत्त्वाचे कारण. दोन्ही देशांना स्वत:च्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यात पुरते अपयश आले आहे. अगतिकतेमुळे का असेना, गेल्या सुमारे वर्षभरात पाकिस्तानची भारतविरोधातील भूमिका मवाळ तर झालीच, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कधी नव्हे तो त्याचा उल्लेख त्यांच्या थेट राष्ट्रीय धोरणातही झाला. त्यामुळे भारत-पाक सीमेवर शांतता असेल अशी शक्यता निर्माण झाली. मात्र पाकिस्तानात राजकीय नाटय़ रंगले आणि देश अशांततेच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्लामाबादमध्ये काय होणार हे रावळिपडीमध्ये ठरते, हे पाकिस्तानातील सत्य आहे. तिथे लष्कराच्या मदतीशिवाय कोणतेही पान हलत नाही. २०१८ साली लष्कराच्या इच्छेनुसारच इम्रान खान यांना पुढे केले गेले आणि ते पंतप्रधान झाले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून लष्कर आणि इम्रान खान यांच्यामध्ये मतभेदांची दरी वाढते आहे. आजवर सर्व पंतप्रधान हे लष्कराच्या अंकित राहिले आहेत आणि पाक लष्कराची भूमिका भारतविरोधी असे चित्र होते. तर आता प्रथमच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल उमेद बाज्वा यांना भारत-अमेरिके सोबत मैत्री हवी े, तर इम्रान यांचे लक्ष आहे अमेरिकाविरोधावर. 

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan sri lanka current economic crisis and their relations with india mathitartha dd
First published on: 09-04-2022 at 11:38 IST