हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणत: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात अश्वघोष या बौद्धधर्मीय संस्कृत महाकवीने ‘वाल्मीकिरादौ च ससर्ज पद्यम्’ (बुद्धचरित) अर्थात् ‘महाकवी वाल्मीकि यांनी पहिल्यांदा पद्य-काव्य निर्मिले’ असे म्हटले आहे. ज्येष्ठ संस्कृतज्ञ शेल्डन पोलॉक यांनी दाखवून दिल्यानुसार, इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात लिव्हियस नामक लॅटिन साहित्यकार याला लॅटिन साहित्यामध्ये आद्यकवी मानले जाई. पोलॉक यांनी नमूद केल्यानुसार, या दोघांना त्या- त्या साहित्यविश्वात ‘आदिकवित्वा’चा मिळालेला मान हे संबंधित साहित्य क्षेत्रातील एका महत्त्वाच्या बाबीचे निदर्शक आहे. ढोबळपणे अभिजात संस्कृत साहित्यात वाल्मीकी रामायणाच्या आधीचं साहित्य हे बहुतकरून एका विशिष्ट विषयमर्यादांच्या, विशेषत: काहीसे धर्मकर्मकांड, तत्त्वज्ञानप्रवण कक्षांच्या धाटणीचे राहिले. म्हणूनच बहुधा अश्वघोषादि अभिजात संस्कृत साहित्यकारांच्या धारणेनुसार वाल्मीकी ‘रामायण’ हे पहिले महाकाव्य- ज्यात रामचरित्राच्या निमित्ताने मानवी भावना, संवेदनेचा वैयक्तिक हुंकार प्रकटला. यासंदर्भात मराठीचा विचार करायचा झाल्यास म्हाइंभट यांचे ‘लीळाचरित्र’ किंवा ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांना (मुकुंदराज किंवा अन्य साहित्यकारांच्या रचना या दोन कृतींहून आधीच्या असल्या तरीही) मराठीतील आद्यग्रंथ असे संबोधले जाते हे आपण जाणतो. सामान्य-उच्चवर्णीयेतर समाजातल्या धारणा, सामाजिक-सांस्कृतिक रचनांचे संदर्भ व त्यांवर बेतलेली वैचारिकता या दोन ग्रंथांतून पहिल्यांदाच प्रकट झाली अशी मराठी बुद्धिजीवी विश्वातील धारणा आहे. या धारणेमुळेच हे दोन ग्रंथ मराठी साहित्य चळवळीच्या आरंभीच्या काळातले आदिग्रंथ समजले जातात. वर नमूद केलेल्या लॅटिन साहित्यविश्वातील आदिग्रंथाचे ‘आद्यत्व’देखील या अशाच धारणेवर बेतल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literature history and society itihashache chashme dd70
First published on: 23-08-2020 at 07:20 IST