‘सुगीभरल्या शेतातून’ या कवितासंग्रहात निसर्गकवी इंद्रजित भालेराव यांच्या निवडक कवितांचे संपादन रणधीर शिंदे यांनी केले आहे. ‘माझे संस्कारक्षम वय  खेडय़ात आणि शेतीत राबण्यातच गेल्यामुळे माझ्याही नकळत कवितेचा विषय ठरून गेलेला असतो.  शेती हे माझ्या आयुष्यातले आणि कवितेतलेही नंदनवन आहे.’ असे एका मुलाखतीत इंद्रजित भालेराव यांनी म्हटले आहे. निसर्ग, शेती आणि शेतीशी संबंधित गोष्टींमध्येच त्यांची कविता रुंजी घालत असते. मात्र त्यांची कविता निसर्ग आणि शेतीशी संबंधित अगणित गोष्टींशी गुज साधत असते. निसर्गाचं मनोहारी चित्रण त्यांच्या कवितेतून दिसते. शेतीशी संबंधित असल्याने श्रमसंस्कृतीचा अनोखा आविष्कार या कवितांमधून दिसतो. त्यांची कविता शेतीजीवनाशी बांधलेली आहे. निसर्गाविषयी असलेले प्रेम, श्रद्धाभाव त्यांच्या कवितांमधून प्रकट होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माझ्या कवितेला यावा शेना-मातीचा दर्वळ

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review sugibharalya shetatun by author indrajit bhalerao zws
First published on: 20-06-2021 at 01:01 IST