१९६७ साली बंगालमधील नक्षलबारी भागात भूमिहीन शेतमजूर आणि बटाईदारांनी चारू मुजुमदार, कानू संन्याल आणि जंगल संथाल या तिघांच्या नेतृत्वाखाली जमीनदारांविरुद्ध आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी २७४ चौरस मैल प्रदेशातील शेतजमिनीवर ताबा मिळवला. सरकारने हे आंदोलन चिरडण्याचे आदेश दिल्यानंतर २३ ते २५ मे या तीन दिवसांत गावकरी व पोलीस यांच्यात मोठा संघर्ष झाला. त्यात प्रसादज्योत गावात नऊ गावकरी ठार झाले. तो दिवस होता २५ मे! या पहिल्या हिंसक ठिणगीला आता ५० वष्रे पूर्ण झाली असून, नक्षलवादी दरवर्षी हा दिवस ‘नक्षलबारी दिन’ म्हणून साजरा करतात. आजही नक्षलवादी कारवाया तितक्याच जोमाने सुरू असल्या तरीही या चळवळीने आपला मूळ उद्देश मात्र गमावला आहे. नक्षलवादी चळवळीच्या पन्नाशीनिमित्त तिचा रोखठोक लेखाजोखा मांडणारा लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘क्रांती घडवून आणण्यासाठी पोलादी शिस्तीचा पक्ष, जनसेना आणि संयुक्त आघाडी या तीन जादूई हत्यारांची गरज असते. शस्त्रबळाद्वारे राज्यसत्ता हिसकावणे, युद्धाद्वारे तंटे सोडवणे हेच क्रांतीचे केंद्रीय काम व सर्वोच्च रूप आहे. जर तुम्हाला झाडावरच्या माकडांना घाबरवायचे असेल तर झाडाखाली कोंबडी कापा.. आपसूकच ध्येय साध्य होईल.’’ माओच्या या तीन वाक्यांत या देशात सुरू असलेल्या नक्षलवादी चळवळीचा इतिहास सामावलेला आहे. परवा, २५ मे रोजी सशस्त्र नक्षलवादी चळवळीला ५० वष्रे पूर्ण झाली. गेल्या पाच दशकांत या चळवळीने काय कमावले आणि काय गमावले, यावर विचार करण्याआधी या चळवळीच्या उगमावर नजर टाकणे अपरिहार्य ठरते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on 50 years of naxalite movement in india
First published on: 28-05-2017 at 03:13 IST