‘भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..’ हा भूषण कोरगांवकर यांचा लेख मराठी भाषा सर्व स्तरांवर रुळण्यासाठी काय करायला नको हे समर्पक भाषेत सोदाहरण सांगणारा आहे. मुलांना मराठीचं बाळकडू मिळण्यासाठी मराठी शाळांत घाला, हा टाहो फोडूनही काही परिणाम झालेला दिसत नाही. उलट पुरेशा विद्यार्थिसंख्येअभावी अनेक मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत हे खेदकारक आहे. महापालिकेच्या मराठी शाळांतून शिक्षण घेऊन झालेले प्रथितयश साहित्यिक, डॉक्टर, उद्योजक, अभियंते यांची खूप उदाहरणं महाराष्ट्रात सापडतील. ते झालं महाराष्ट्रापुरतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे जगभरात शिक्षण, उद्योगात टिकायला इंग्रजीचाच टेकू हवा हेच सर्व पालकांच्या डोक्यात बसलंय. काही अंशी ते खरं असेलही; पण सगळेच पाल्य महाराष्ट्र सोडून जातील असं नाही ना? मग मराठीशी प्रतारणा का? आता तर सरकारी आस्थापना, न्यायालयातही स्थानिक भाषेत पक्षकारांना निकालपत्र देण्याची सक्ती केली जाऊ शकते, असं सर्वोच्च न्यायालयच सांगतं. मग अडलंय कुठे, हा विचार करून मराठी राजभाषा करण्याआधी निदान प्रमाण व बोलीभाषा म्हणून तरी रुळण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील साहित्यिक, भाषतज्ज्ञ, शिक्षक, प्राध्यापक यांच्या मदतीनं केले गेले पाहिजेत.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang readers reaction loksatta readers reaction on lokrang article zws
First published on: 19-03-2023 at 01:05 IST