(मिस्टर नटवरलाल- जे की अमिताभ बच्चन यांची, तसेच महाकवी आनंद बक्षी यांच्या काव्यातील त्या वाघाची क्षमा मागून सादर करीत आहोत- आमचाही एक वायदेबाज किस्सा..)मेरे पास आवो मेरे मित्रोंएक किस्सा सुनो(अंहं. सेल्फी नै काढायची!सिर्फ किस्सा सुनो..)कई साल पहले की बात हैकाही वर्षांपूर्वीची..?नाही, महिन्यांपूर्वीचीनाही, दिवसांपूर्वीचीउफ् ओ, पुढं तरी सरका ना..किती दिवस मागच्याच दिवसांत अडकून राहणार?सांगतो सांगतो..घडी थी, हाथ थाअंधेरा मगर सख्त थासतत दहा वाजून दहा मिनिटांचासमय बडा कठीन थाचारी बाजूंनी साठला होता अंध:कारत्याहून वाईट होता पोटातल्या भुकेचा मारअखेर बदलू म्हटले दिल्लीतले सरकारअचानक समोर आला छोटा सरदारमी पळालो, तो धावलामी गप्प, तो बोललामी चहाला, तो चर्चेलामी टीव्हीपुढं, तो सभेलामी ताडताड, तो धाडधाडमी ऐकतोय, तो फाडफाडअरे बचावलो.. बचावलो..!तो दिल्लीत, तो गल्लीततो कॅमेऱ्यात, तो सेल्फीततो गाडीत, तो थ्री-डीततो झोपडीत, तो माडीततो आकाशात, तो पाताळाततो ईदीत, तो नाताळाततो भाषणांत, तो घोषणांत‘अच्छे दिनां’च्या आश्वासनात बचावलो.. बचावलो..अरे पळा रे पळात्याच्या मागे पळा!फिर क्या हुवा?देवाची शप्पथ लई मज्जा आलीआयुष्यात माझ्या कित्ती कमळं फुलली!कमळं फुलली?पण ही तर सुकलीत!अरे, हे सुकणं म्हणजे काय सुकणं आहे लल्लू?थांब.. अच्छे दिन उद्यापासून येणार आहेत..काँय?!