महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांची आज (१२ जून) पुण्यतिथी.. त्यानिमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात पुलंचे सुहृद आणि ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी केलेलं भाषण पुनर्मुद्रित करीत आहोत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले दोन दिवस मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’ने सादर केलेले ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘बटाटय़ाची चाळ’चे प्रयोग तुडुंब भरलेल्या रसिकांनी हशा आणि टाळ्यांची प्रचंड दाद देताना मी पाहिले त्यावेळी मला विलक्षण अनुभव येत होता. हे कार्यक्रम होत होते पुलंच्या पुण्यतिथीनिमित्त. ‘पुण्यतिथी’ हा शब्द मृत्यूचा सूचक आहे. पण काल हे दोन प्रयोग बघत असताना आणि दाद अनुभवत असताना मला जाणवलं ते असं की, पु. ल. देशपांडेंसारखी अशी माणसं क्वचितच जन्माला येतात, की ज्यांच्या बाबतीत ‘पुण्यतिथी’ हा शब्द खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण असतो. आमच्या लहानपणी सांगत की, दान दिलं की पुण्य लागतं. कोणी जलदान करी. कुणी अन्नदान करी. कुणी धनदान करी. त्याने पुण्य लागतं, गोष्ट खरी आहे. पण अन्न शेवटी खाऊन संपतं. पाणी पिऊन संपतं. धन खर्च करून संपतं. पण पुलंनी जे आपल्याला दान दिलंय ‘आनंदाचं’- ते कितीही खर्च केलं तरी पुन:पुन्हा आपण ते अनुभवू शकतो.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pl deshpande s death anniversary mangesh padgaonkar speech on pl deshpande zws
First published on: 12-06-2022 at 00:05 IST