मतदार यांद्यामधील नावांच्या चुका, अनेकांची नावे गायब होणे आदी प्रकारांमुळे संतप्त झालेल्या मतदारांनी ईशान्य मुंबई मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घातला.मतदार यादीत नावच नाही, यादीत नाव एकाचे, त्यावरील फोटो दुसऱ्याचा तर पत्ता तिसऱ्याचाच असे अनेक प्रकार घडल्याने अनेक मतदारांना मतदान न करताच परत फिरावे लागले. या घोळामुळे मुलुंड पूर्वमध्ये मतदाराच्या संतापाचा उद्रेक झाला. सुमारे दोनशे मतदारांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. मात्र पोलिसांनी या जमावास बाहेरच रोखले. भाजपाचे उमेदवार किरीट सोमय्या यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.