येत्या लोकसभा निवडणुकीनंतर संसद त्रिशंकू असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़  कारण भाजपला आतापर्यंतच्या सर्वात अधिक जागा मिळून तो देशातील एकमेव मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल, याबाबत आपण पूर्ण आशावादी आहोत, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला आह़े  तसेच स्वातंत्र्यापासून देशावर सत्ता गाजविणारा काँग्रेस त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा मिळवील, असेही भाकीत त्यांनी केल़े देशभरातील स्थिती पूर्णत: भाजपच्या बाजूची आह़े  आजवर इतके अनुकूल वातावरण पाहिले नव्हते, असेही अडवाणी  शनिवारी पक्ष मुख्यालयात म्हणाल़े