काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंह आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज(बुधवार) काँग्रेसने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा सादर केला. यावेळीचा जाहीरनामा राहुल गांधींच्या कल्पनेतून सुचविलेल्या नव्या पद्धतीनुसार तयार करण्यात आला आणि यासाठी पाच महिन्यांचा कालवधी लागल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. राहुल गांधींच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले ३१ संवाद कार्यक्रम, १५३ दिवसांचा दौऱा आणि १.३ लाख लोकांनी दिलेल्या ऑनलाईन सुचनांचा अभ्यासकरून जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. काँग्रेसचा 'लोकसभा निवडणूक २०१४'साठीचा जाहीरनामा वाचण्यासाठी खालील छायाचित्रावर क्लिक करा: