भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे भारतासाठी धोकादायक असल्याचे मत बहुजन समाज पक्षाच्या(बसप) अध्यक्षा मायावती यांनी व्यक्त केले आहे.
त्या म्हणाल्या की, राहुल आणि मोदी हे देशासाठी घातक आहेत आणि याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नसला, तरी त्यांचेच नाव काँग्रेसमध्ये चर्चेत आहे. परंतु, राहुल यांना कोणताही अनुभव नाही आणि दुसऱया बाजूला मोदींचा 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीतील सहभाग कोणी नाकारू शकत नाही, त्यामुळे देश या दोघांवरही विश्वास ठेवू शकत नाही.”