अन्न सुरक्षा कायद्यामुळे तिजोरीवर सव्वा लाख कोटींचा बोजा पडणार असल्याचे सांगत या योजनेला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आधी विरोध केला होता, पण पवार यांच्यामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाल्यानेच या कायद्याची अंमलबजावणी शक्य झाल्याचा दावा राष्ट्रवादीन केला आहे. तसेच अल्पसंख्यांकाच्या कल्याणाकरिता  सच्चर आयोगाची अंमलबजावणी पवार यांच्यामुळे लगेचच झाली. आता मुस्लिमांना नोकऱ्यांमधील आरक्षणाचा निर्णय निश्चित वेळेत घेतला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रकाशित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘लोकसभा निवडणूक २०१४’साठीचा जाहीरनामा वाचण्यासाठी पुढील छायाचित्रावर क्लिक करा: