शिरोमणी अकाली दल-भाजप आघाडीने मोदी नावाचा जप सुरू केला आहे तो त्यांचा भ्रम असून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार रचनात्मक विकास करू शकत नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रणीत कौर यांनी केली आहे.आपल्या निवडणूक जाहीर सभेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणाऱ्या मोदी यांच्यावर प्रणीत कौर यांनी चांगलेच ताशेरे ओढले. लालकृष्ण अडवाणी यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली त्याचा उल्लेख करण्यास मोदी विसरले. मोदी यांचे राजकारण एककेंद्री असून तेथे लोकशाहीला वाव नाही, असेही प्रणीत कौर म्हणाल्या.