भारत आणि बांगलादेश या दोन देशांमधील संबंध अधिक सुधारणे गरजेचेच आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी विनंती मणिपूरचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केली. मणिपूरचा विकास आणि या राज्यातील वाहतुकीचे जाळे विस्तारणे यासाठी हे संबंध सुधारणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्रिपुरा भारताशी बांगलादेशमधील रस्ते आणि रेल्वेमार्गाने जोडले गेले होते. आज पुन्हा एकदा हे मार्ग सुरक्षितपणे खुले होण्याची गरज असल्याचे सरकार यांनी सांगितले.