आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे देशभरातील काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मदत करीत असल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसने केला.
केजरीवाल यांनी नुकतेच मोदींना एक पत्र लिहिले होते. या पत्रात केजरीवल यांनी रस्ते, शिक्षण, आरोग्य व विकास आदी मुद्दय़ांवर ११६ प्रश्न मोदींना विचारले होते. मात्र त्यांनी २००२च्या गुजरात दंगलीबाबत काहीच विचारणा केली नाही. त्यावरून केजरीवाल काँग्रेसची दिल्ली आणि इतर राज्यांतील धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार संदीप दीक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना केला.