नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला त्याची निवडणूक आयोगाने स्वत:हून दखल घ्यावी, असे बसपाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे.मिरवणुकीसाठी जी गर्दी जमली होती ती शहराबाहेरून आली होती, अशी माहिती असल्याचे मायावती यांनी सांगितले. तसेच माध्यमांनीही त्याला एकतर्फी प्रसिद्धी दिली तो प्रकार योग्य नाही अशी टीका केली.आयोगाने स्वत:हून याची दखल घ्यावी, असे मायावती म्हणाल्या.