वाराणसी लोकसभा मतदारसंघात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षातर्फे आपण निडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे वरिष्ठ काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी सोमवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून कळवले आहे.
धर्मनिरपेक्ष भारताची प्रतिमा धोक्यात आली असून बनारसमधून मोदींविरोधात आपल्याला निवडणूक लढण्याची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रवक्ते असणाऱ्या राशिद अल्वी यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
वाराणसीसारख्या प्रसिद्ध शहरामध्ये धर्मनिरपेक्ष काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वस व्यक्त करीत काँग्रेसचा विजय हा भारताचा विजय असेल, असेही अल्वी म्हणाले.