‘जेएम फायनान्शिअल’ या संस्थेने सव्र्हेक्षण करून नुकत्याच मांडलेल्या अहवालात यंदा मान्सून साधरण झाला तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न २० टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मान्सूनमुळे शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रातील २० टक्के उत्पन्न वाढणार असून ग्रामीण भागातील उत्पन्न १२ टक्क्यांनी वाढण्यास मदत होणार आहे. २०१४-१५ या वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न ३ टक्क्यांनी तर २०१५-१६ या वर्षांत ४ टक्क्यांनी कमी झाले. २०१४ आणि २०१५ या वर्षांत मान्सूनचे प्रमाण अनुक्रमे १२ आणि १४ टक्क्यांनी कमी झाले होते. हवामान खात्याने यंदा १०६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा २०१४-१५ मध्ये २२ टक्क्यांनी तर २०१५-१६ मध्ये १८ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत पाऊस झाला. या पावसामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण त्याचबरोबर काही भागातील फळबागांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. जळगावमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र, त्यामुळे विविध भागांतील वीजपुरवठा खंडीत झाला. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.