गतवर्षी ‘व्हाइटफ्लाय’ किटकांच्या प्रादुर्भावामुळे पंजाब आणि हरयानातील २७ टक्के म्हणजे ७.५६ लाख हेक्टर कापूस शेतीक्षेत्रात घट झाली आहे. किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादना घेण्याऐवजी इतर पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले. २०१५-१६ या वर्षांत या दोन्ही राज्यांत १०.३ लाख हेक्टर जमिनीवर कापूस लागवड करण्यात आली होती. ‘व्हाइटफ्लाय’ किटकांच्या प्रादुर्भावामुळे या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागले, अशी माहिती कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या किटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १५ मेपूर्वी पेरण्या पूर्ण करण्याचा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आला होता. दुष्काळग्रस्त व थकबाकीदार शेतकऱ्यांना मोफत बियाणे यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळग्रस्त असूनही सरकारकडून कोणतेच साहाय्य न मिळालेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. - ‘इंडियन र्मचटस चेंबर’ या संस्थेने यासाठी सरकारशी सहकार्याचा हात पुढे केला असून मोफत बियाणे वाटपासंबंधीचा करारही सरकारसोबत केला आहे. या संबंधीच्या सामंजस्य करारावर सरकार आणि ‘इंडियन र्मचटस चेंबर’च्या प्रतिनिधींनी नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. सन २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधीत पीक कर्जे घेतलेले जे शेतकरी आजपर्यंत कर्जफेड करू शकलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून मोफत बियाणे देण्यात येईल.