महाराष्ट्रात १३ हजार १६५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही ६ लाख २८ हजार ६४२ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७१. ९ टक्के झाला आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३४६ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मृत्यू दर ३.३५ टक्के इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आजवर पाठवण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ६० हजार ४१३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

प्रमुख शहरं आणि तिथल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई १७ हजार ९१४
ठाणे २० हजार १०४
पुणे ४० हजार ६६५
पालघर ६ हजार ३९९
रत्नागिरी १ हजार २९४
सातारा २ हजार ८४५
कोल्हापूर ६ हजार ९३२
औरंगाबाद ६ हजार २३३
नागपूर ७ हजार ९४६

सध्या राज्यातील अनेक शहरांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉट वगळता इतर भागांमधली दुकानं ही ऑड इव्हन पद्धतीने सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. या संदर्भात त्या त्या महापालिकांनी निर्णय घेतला आहे. आता महत्त्वाची बाब ही आहे की हळूहळू लॉकडाउनमधून बाहेर कसं पडायचं. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत.