सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर व बार्शीनंतर आता माळशिरस तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव जास्तच वाढू लागला आहे. ऑगस्टअखेर या भागात करोना विषाणू वाढत असून गेल्या २५ दिवसांत २४०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४ मृतांची भर पडली आहे. दुसरीकडे करोनामुक्त होण्याचे प्रमाणही ५३ टक्कय़ांवरुन ६५ टक्कय़ांपर्यंत वाढले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सोलापूर शहर व जिल्ह्यात नवे ५०२ रुग्ण सापडले. सुदैवाने मृतांची संख्या घटली असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत रुग्णसंख्या ३१ हजार २८९ वर पोहोचली असून मृतांचा आकडा १०९९ म्हणजे अकराशेच्या घरात गेला आहे. यात जिल्हा ग्रामीणमधील रुग्णसंख्या २३ हजार १०४ आणि मृतांची संख्या ६३३ इतकी झाली आहे. तर सोलापूर शहरातील रुग्णसंख्या ८१८५ आणि मृतांची संख्या ४६६ वर पोहोचली आहे. दुसरीकडे आतापर्यंत २१ हजार ९८९ रुग्ण करोनामुक्त झाले असून सध्या ८५०३ रुग्ण सRिय आहेत. यात शहरातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ६७४३ (८२.३८ टक्के) आहे. तर सRिय रुग्णांची संख्या ९७६ (११.९२ टक्के) इतकी आहे. मृत्युचे प्रमाण अद्यपि ५.७० टक्के एवढी आहे.

जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत १५ हजार २४४ रुग्ण करोनामुक्त झाले असून एकूण रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ६५.९७ टक्के आहे. तर सRिय रुग्णसंख्या ७२२७ (३१.२८ टक्के) एवढी आहे. शहर व जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ५१ हजार ५७८ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत आढळून आलेल्या रुग्णांचे प्रमाण १२.४३ टक्के आहे. यात जिल्हा ग्रामीणमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १३.३० टक्के आहे.

शुRवारी माळशिरसमध्ये सर्वाधिक १०२ नवीन रुग्ण सापडले. पंढरपूर येथे ७८ तर बार्शीत ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. माढा येथे ७१ रुग्ण आढळून आले. याशिवाय सांगोला—३६, मंगळवेढा—२७, दक्षिण सोलापूर—१३ याप्रमाणे नव्या रुग्णांची भर पडली. यात माळशिरसमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत आहे. यापूर्वी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर येथे करोनाचा प्रादुर्भाव होता. त्यानंतर बार्शी व पंढरपूर येथे प्रादुर्भाव वाढला. त्यापाठोपाठ आता माळशिरस येथे रुग्ण वाढत आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत माळशिरसमध्ये १३४६ रुग्णसंख्या होती. तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात आता २४०२ रुग्णांची नव्याने भर पडून रुग्णसंख्या ३७४८ तर मृतांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. दरम्यान, माळशिरसमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत १४४६ पैकी ७२१ रुग्ण (५३.५६ टक्के) करोनामुक्त झाले होते. आता करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १२७८ (६४ टक्के) एवढी झाली आहे. सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३४ टक्के आहे. हेच प्रमाण ३१ ऑगस्टपर्यंत ४४.४२ टक्कय़ांवर होते.