महाराष्ट्रात जानेवारी २००१ पासून ऑक्टोबर २०१७ या १७ वर्षांच्या कालावधीत २६ हजार ३३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यांपैकी १२ हजार ८०५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती राज्य सरकारने अधिवेशनादरम्यान आज विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या वर्षी १ जानेवारी ते १५ ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील ५८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ११५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.