कवठे महांकाळहून पुण्याला निघालेल्या एस.टी बसला चिंचनी रस्त्यावर झालेल्या अपघातात तीन ठार तर २५ जण जखमी झाले. रविवारी सकाळी ९च्या सुमारास हा अपघात झाला.
वेगवान एस.टी बस पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. आनंदराव भोसले (वय ६५) आणि त्यांची पत्नी फुलाबाई भोसले (वय ६०) , रा. दुळगाव, ता. कवठे महांकाळ, सध्या राहणार दिगी पुणे, शिवाजी खोत (वय ७५) रा.लोणारवाडी, कवठे महांकाळ अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात २५ जण जखमी झाले असून, त्यांना सांगलीतील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एस.टी चालक आणि वाहक जखमी झाले असून, त्यांनाही उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.