मुंबई- नाशिक महामार्गावर कसारा गावाजवळील अमन हॉटेलसमोर सव्‍‌र्हिस रोडवर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी वाहनाने बुधवारी पहाटे चारच्या सुमारास धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाले असून, वाहनाच्या चालकासह अन्य एक प्रवासी जखमी झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.

शिर्डी येथे साई दर्शनासाठी निघालेले कैलास पांडुरंग मढवी (४५), हनुमंत सुरेश शिंगटे (३५) आणि दिनकर अनंता भोईर (५५) यांचा अपघातात मृत्यू झाला.