लोकसत्ता, खास प्रतिनिधी अलिबाग- रायगड जिल्ह्यात करोनामुळे आत्तापर्यंत ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या १९ हजार २९८ वर पोहोचली आहे. यातील १५ हजार ३३५ उपचारानंतर बरे झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात ३७६ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. २९१ जण करोनातून बरे झाले तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात ३७६ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १७९, पनवेल ग्रामिण मधील २६, उरण मधील २५, खालापूर २०, कर्जत ८, पेण ३३, अलिबाग ४१, मरुड २, माणगाव ९, तळा ०, रोहा १२, सुधागड ७, श्रीवर्धन १, म्हसळा २, महाड ८, पोलादपूर ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ४, पनवेल ग्रामीण १, खालापूर १, महाड १, पोलादपूर येथे १ अशा एकुण ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात २९१ जण करोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यातील ६४ हजार ७१४ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४३९ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ६११, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३४१, उरण मधील १४०, खालापूर २१३, कर्जत ७२, पेण २६८, अलिबाग २३४, मुरुड २२, माणगाव ८४, तळा येथील १०, रोहा २५५, सुधागड ३३, श्रीवर्धन १५, म्हसळा १४, महाड ११७, पोलादपूर मधील १० करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ७९ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.