राज्यात दिवसभरात ५,६०० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५,०२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिवसभरात ५,६०० करोनाबाधितांच्या नोंदीमुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या १८,३२,१७६ एवढी झाली आहे. तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १६,९५,२०८वर पोहोचली आहे. तर आजवर ४७,३५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.