उसतोडीच्या कामासाठी उस्मानाबाद येथे जाणाऱ्या, कामगारांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पो नदीत कोसळल्यामुळे ७ कामगारांचा मृत्यू झाला असून १५ जणं जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात घडला.

अपघातातील मयत हे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्याचे रहिवासी असल्याचं कळतंय. अरुंद पुलाचा अंदाज चालकाला न आल्यामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. या अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी जखमींना पाण्यातून बाहेर काढत, नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं.